शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

हापूसच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करणार : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:30 IST

रत्नागिरी : कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे महाराष्ट्रभर मार्केटिंग व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करणार असून, राज्यातील अन्य पिकांचे विविध जिल्ह्यांत ...

रत्नागिरी : कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे महाराष्ट्रभर मार्केटिंग व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करणार असून, राज्यातील अन्य पिकांचे विविध जिल्ह्यांत प्रदर्शन भरविण्याचाही शासनाचा मानस आहे. त्याची जबाबदारी पणन विभागाने घ्यावी. त्यासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबरोबर शेतकºयांना विक्री कौशल्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आंबा व काजू उत्पादक शेतकरी यांच्या सोयीसाठी महाराष्टÑ स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत उभारलेल्या अद्ययावत लिलावगृहाचे उद्घाटन सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे उपस्थित होते.सेस हा बाजार समितीचा एकमेव उत्पन्नाचा मार्ग आहे, त्यामुळे तो बंद करता येणार नाही. मात्र मच्छिमारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना बाजार समिती संचालक मंडळाची एकत्रित असणारी वाटचाल सकारात्मक आहे. आंबा, काजू उत्पादक शेतकरी यांचे पुनर्गठित कर्ज, व्याजमाफीची रक्कम अद्याप मिळालेली नाही. मच्छिमारांचा डिझेल परतावा व अन्य समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावून मार्ग काढावा, अशी सूचना सामंत यांनी केली.